Total Page-Views

Sunday, October 12, 2025

आठवणींचा kaleidoscope (३)

१९८१-८२ ...  जिल्हा परिषद प्रशाला, तुळजापुर. गाव तेंव्हा खुप लहान होतं. आज दिसते तशी गर्दी बिलकुल नव्हती. १०वी चं शालेय वर्ष सुरु होतं. माझा अभ्यास जोरात सुरू होता. Prelim. exam. (सराव परीक्षा!)मधे मला ८९% टक्के मार्क्स पडले  होते. मी  लिहिलेला  मराठी निबंध आमच्या . . प्रयाग सरांनी वर्गात साऱ्या  मुलांसमोर  वाचून  दाखवून माझं खूप कौतुक  केलं होतं; मी राज्यात पहिला  (किमानपक्षी बोर्डात तरी) येईन अशी त्यांना ( थोडीशी  मलाही) अपेक्षा होती! वार्षिक परीक्षा  जवळ आली  होती. मला आठवतंय, रंगपंचमीच्या दुस-या  दिवसापासून परीक्षा  सुरु  होणार होती. पहिला  पेपर  मराठीचा होता. मी  रंग-पंचमीदिवशी सालाबादाप्रमाणे रंग खेळता (! 😊) घराच्या  माडीवरून  अभ्यास करता-करता खाली रावळगल्लीत रंग-पंचमीचा  चाललेला जल्लोष पाहत होतो! मराठीचा  तसाही  अभ्यास  काही फार नसतो; आपला अभ्यास  झालेला आहे, असं वाटून आश्वस्तही होतो!

परीक्षेचा  दिवस  उजाडला. मी  देवाच्या, आईच्या पाया पडून निघालो. शिंदे  हायस्कुल मध्ये नंबर आला होता. Hall ticket वगैरे दाखवून वर्गात बसलोघंटा वाजली, पेपर हातात पडला.आणि  कसं  कोण  जाणे , पण  मी आधी निबंध लिहिण्याचं  ठरवलं! आता विषय आठवत  नाही पण एवढं  लख्ख आठवतंय  कि अगदी  खनपटीला बसलो होतो की, काही  तरी  फार  भारी  उपमा , अलंकार , दोन ओळींच्या यमकात बसणा-या सुरेख काव्यपंक्ती सुचतील... पण  कसलं काय! इतर वेळेसअगदी  हुकमी कविता लिहिणारी माझी  प्रतिभा  (?!) माझ्यावर पुर्णत: रुष्ट  झाली  होती. (नाही; मी लेखक /कवी  नाही  याची  मला  पूर्ण  कल्पना आहे; पण  त्या  condition ला  'writer's block' म्हणतात हे मला - वर्षांपूर्वी  कळलं!)असा बराच  वेळ गेला असेल  प्रतीक्षेत; अर्ध्या-पाऊण  तासाने  मला  जरा  भान  आलं, "प्रशांत, आता  काही  तरी खरडून निबंध  पूर्ण  कर बाकीचे  प्रश्न सोडवायला घे लवकर".. भरभर  लिहून  सर्व प्रश्न attempt केले ; पेपर संपला

माझं  मन  सांगत  होतंच की पेपर काही  चांगला  गेला  नाही.. पण  ते  फारसं मनाला  लावून घेता बाकीचे पेपर्स  दिले; छान  गेले होते

Result लागला! गुण-पत्रिका  हातात घेतली, मराठीत फक्त ६० मार्क्स  पडले होतेज्याच्यामुळे बाकीच्या विषयात खूप चांगले मार्क्स पडूनही (गणित १४९/१५०, इंग्रजी ८९/१००, विज्ञान  १४०/१५०)  average ८५% झाले. जे  नक्कीच माझ्या अपेक्षेपेक्षा  खूप कमी होते. राज्यात पहिला  काय,बोर्डात  पहिल्या

३० विद्यार्थ्यातही आलो  नव्हतो! नाराज  नक्कीच  झालो  होतो  पण निराश नाही!

..आता चार दशकानंतर मागे वळून पाहताना वाटतं; झालं ते  बरंच  झालं!चुकून-माकून आपण  राज्यात १०वे-१२वे  आलो  असतो  (इथेही  मी  पहिला  वगैरे  म्हणत  नाही हं 😊) तर ते यश  मला  झेपलं  असतं कामाझे  पाय जमिनीवर  राहिले असते का? दहावीतील  यशाने  हुरळून  जाऊन मी १२वीला आपटी  खाल्ली  असती का

हे  थोडंसं  "द्राक्षे  आंबट  आहेत" असं  म्हणण्यासारखं आहे याची मला  कल्पना  आहे.  But if I understand myself correctly, may be, I was not that level-headed in my childhood so it was a blessing in disguise!

(खूप वर्षानंतर, अमेरिकेत  सिलिकॉन व्हॅली  मध्ये, न्यूयॉर्क मध्ये वगैरे SAP projects मधे काम  करताना कळलं की बोर्डात आलेल्या (अगदी पहिला ) वा  IIT/IIM मधून  pass out झालेल्याना शिंगे नसतात, ते  आपल्या  सारखेच असतात आणि  त्यांच्या तुलनेत आपण स्वतःला जेवढे समजत होतो तेवढेहीगल्लीतले बॅट्समननाही आहोत! किंबहुना, -याच बाबतीत सरसही

..असो! तर दहावीच्या परीक्षेतील अपेक्षा-भंगाचं दुःख काही दिवसातच मागे  पडलं  होतं. आता ११वी/१२वी  साठी  तुळजापूर  सोडून  बाहेर पडायचं होतं. डॉक्टर किंवा  इंजिनियर (तेही Govt college मधुनच) असे  दोनच पर्याय  असण्याचा  काळ (आणि मध्यमवर्गीय परिस्थितीहोता तो! सोलापूर खुणावत होतं.. (तेंव्हा ते महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर होतं!) 

आणि जून १९८२ च्या पहिल्या आठवड्यात माझ्या मोठ्या भावाबरोबर  (कै. प्रफुल्ल) आम्ही सोलापूरला जाण्यासाठी एस.टी. पकडलीगादीची वळकटी, टपावर ठेऊन  आणलेली जुनी सायकल, प्लॅस्टिकची मोठी बादली  आणि छोटी सुटकेस (   प्रयाग सरांनी  'शाळेत पहिला  आला म्हणून बक्षीस' दिलेल्या ५१ रुपयातून  घेतलेली) हा जामानिमा घेऊन सोलापूर बस-स्टॅण्ड वर उतरलो!…

घर सोडून  होस्टेल मध्ये राहायचंय, सोलापुरातील हुशार मुलांबरोबर स्पर्धेत निभाव लागेल का, याबद्दल मनात थोडी भीती होती, हुरहुर होतीआणि डोळ्यांत स्वप्नं!! 

 

 

 

-प्रशांत  

Thursday, June 12, 2025

Management conundrum of IT Startup’

 Published in ‘Corporate Citizen’ magazine (April’25 issue) - 

https://corporatecitizen.in/v10-Issue11/corporate-insight-management-conundrum-of-it-startups.html

Tuesday, April 15, 2025

असावे घरटे अपुले छान (भाग २)

 


एक महिना लोटलाय; मी ते घरटं ( ती चिमणी ) दररोज एकदा तरी पाहतोय..

या काळात बरंच काही घडलंय. चिमणीने घरट्यात अंडं घातलं असणार. एके दिवशी जेंव्हा घरट्यातून क्षीण चिव-चिव आवाज ऐकू येऊ लागला, चिमणी घरट्याकडे खूप वेळा येऊ लागली तेंव्हा कळलं, पिल्लू झालंय! चिमणी सकाळी साधारण च्या पुढे घरट्याकडे यायची, मग चोचीतून चोचीमध्ये भरवायची पिल्लाला. (मला आधी वाटलेलं , आळी भरवत असेल! प्रोटीनयुक्त आहार! 😊नंतर काही दिवसांनी कळलं, चिमणी आधी exora च्या फुलावर बसून परागकण टिपते ते चोचीतून भरवते! सकाळी ११/११-३० पर्यंत चिमणी १५-२० वेळा तरी आलेली असेल पिल्लास भरवायला! पिल्लू मात्र सकाळी पासूनच तिची वाट पाहायचा चिवचिवाट करायचं. (मला ते गाणं आठवलं 'पक्षिणी प्रभाती चारियासे जाये, पिल्लू वाट पाहे उपवासी'!)

काल चांगलाच जोराचा अवकाळी पाऊस आला आणि मी उगीचच disturbed..त्या पावसाच्या तडाख्याने जास्वंदाच्या छोट्या फांदीवरचं ते घरटं खाली पडलं तर, या काळजीने! पण ईश्वराची लीला म्हणा, चिमणाबाईंचं मजबूत घरटं बांधण्याचं कौशल्य म्हणा, तसं वाईट काही घडलं नाही सुदैवाने! (कारण मी आज सकाळी उठल्या-उठल्या आधी ते घरटं पाहिले, चिवचिव ऐकली आणि हुश्श वाटलं!)

पिल्लाची - आठवड्यात वाढ झाली असेल किंवा चिमणीने कालच्या पावसाचा भविष्यातील धोका ओळखला असेल, काहीही असो पण आजच ते पिल्लू हळूच घरट्यातून बाहेर पडून फांदीवर बसलं. चिमणी आलीच लगेच. खाऊ घालायला असेल वा कौतुक करायला असेल वा उडायचं शिकवायला असेल! -१० मिनिटे त्या फांदीवर बसून जग बघितल्यानंतर पिल्लाने हळूच जवळच्या दुसऱ्या फांदीवर झेप घेतली! तिथे परत -१० मिनिटे बसून पुढची मोठी झेप!!

आता इकडे घरटं रिकामं आहे..

…Empty nest !!

 

 

-प्रशांत

 


कविता करविता

पहिली कविता कोणत्या भाषेत लिहिली गेली, केंव्हा लिहिली गेली, किंबहुना आधी गद्य आले की पद्य, हे नक्कीच संशोधनाचे विषय असतील. ऋग्वेद १५००-१००० BCE काळात लिहिले गेले असं म्हणतात. मराठीमध्ये मुकुंदराज यांनी ११८८ मध्ये 'विवेकसिंधू' लिहिले , जे मराठीतील आद्य साहित्य मानले जाते. आपल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बालपणी कानावर पडलेली पहिली कविता (बडबडगीत)असेल "काव काव ये, चिव चिव ये" , जेंव्हा आई येन-केन-प्रकारेण बाळाला जेऊ घालण्याचा प्रयत्न करत असते तेंव्हा! 😀तसेच १९७५ नंतर जन्मलेल्या पिढीतील बालकांनी रात्री "लिंबोणीच्या झाडामागे" ही अंगाई नक्कीच ऐकली असेल! 🙂

..तर सांगायचा मुद्दा हा की आपल्या मराठी मनावर कवितेचे एवढ्या लवकर खोलवर संस्कार झालेले आहेत! आता अश्या सर्वव्यापी कवितेची व्याख्या वगैरे (परीक्षेत - गुण मिळवून देणारी 😊) सांगायची गरज आहे का? पण तसं केल्याशिवाय लेखाला भारदस्तपणा कसा येईल बरे :-?

तस्मात मला रुचलेल्या काही व्याख्या द्यायचा मोह टाळत नाही..

“Poetry is criticism of life; poetry is appreciation of life.”- Matthew Arnold

“Poetry lifts the veil from the hidden beauty of the world and makes familiar objects be as if they were not familiar.” – Shelley

“Poetry is when an emotion has found its thought and the thought has found words.” – Robert Frost

"शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय.” - सुधीर रसाळ

या थोरा-मोठ्यांच्या मांदियाळीमध्ये gate-crashing करण्याचा अस्मादिकांचा प्रयत्न - "विधात्याने स्त्री निर्माण केली आणि आपल्याच अद्भुत निर्मितीकडे तो अनिमिष नेत्रांनी पाहतच राहिला..अन् त्याला पहिली कविता स्फुरली!"

१२व्या शतकापासून सुरु झालेला मराठी कवितेचा प्रवाह अव्याहत वाहतोय. पंत काव्य, संत काव्य, तंत काव्य हे त्या काव्य-प्रवासातील मैलाचे दगड असावेत.

वृत्तात,मात्रांत यमकात अडकलेल्या मराठी काव्य-सुंदरीला मुक्तछंदाने मुक्त केले, आणि मग ला , री ला री , जन म्हणे काव्य करणारीया आरोपातून मुक्त होऊन समस्त कवींनी (आणि कवयित्रींनी) लेखण्या नवनवोन्मेषाने सरसावल्या. मग मात्र महापुरच आला नां मराठी कवितेला !(त्यात स्मार्टफोन/समाजमाध्यमांची भर!!). "कविता उदंड जाहल्या" वा "कवितांचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त" असं म्हणायची पाळी आली असेल बऱ्याच दुर्दैवी वाचकांवर! (त्या 'महापुरात' अस्मादिकांचेही दोन-तीन ओहोळ सामील असतील बरे का ! "😊)

संवेदनशीलता, भावना यांनी प्रतिभेने व्यक्त होणे म्हणजे कविता. कविता करत नसतात , कविता प्रगट होत असते असं कुसुमाग्रज म्हणतात. दुर्बोध काव्याबद्दल त्यांचं मत "जेंव्हा कवीच्या भावना अस्पष्ट असतात , तेंव्हा कवितेत दुर्बोधता येते." (संदर्भ - प्रतिभा आणि प्रतिमा, दूरदर्शन)

जाणीवांपेक्षा नेणीवांवर भर असतो अशा काव्यात, असं मज पामराचं मत!

नानाविध भावना नेमक्या टिपणारे शब्द , नादमाधुर्य आणि कुठेतरी खोलवर भिडत जाणारा आशय ... भा रा तांबे , बोरकर , विंदा , कुसुमाग्रज , गदिमा, शांता शेळके, पाडगावकर , सुरेश भट , ना धों महानोर यांच्या सकस , समृद्ध काव्यावर पोसलेला आमचा काव्यपिंड..! कवीच्या मनात जो काही भावनांचा कल्लोळ होतोय , जे काही तरी त्याला मनोमन वाटतंय , ते त्याच्या कोणत्याही सामान्य वाचकास त्या कवितेद्वारे नेमके पोहोचणे (to use a technical term – ‘without any transmission loss’) यालाच खरे तर कवीच्या प्रतिभेचे यश म्हणावे लागेल! नाही तर उगीचच abstract art प्रमाणे कवीला याओळीत नेमकं असं म्हणायचे असेल की तसे, का काही वेगळाच अर्थ ध्वनीत करायचा आहे,.. ही बिचाऱ्या वाचकांची चिंता! 🙂

आजकालचे बरेच नवकवी ग्रेसांच्या graceful गूढतेचं अंधानुकरण करताना वाचकांना मात्र शब्दबंबाळ करतात! ("मला झोपायचंय हिमालयाची उशी घेऊन!" 😊)

काही जण एकच एक भाव (उदा: प्रेमभंग / एकाकीपण / नागरी मध्यमवर्गियांची दु:खे) त्यांच्या -याच कवितांतून व्यक्त करताना दिसतात. अर्थात, कविता काय असावी वा त्यातून काय व्यक्त करायचे आहे , ही पुर्णतः वैयक्तिक बाब आहे. पण वाटतं, की फक्त करडया रंगाशिवाय त्यांनी सृष्टीत , आसमंतात व्यापून राहिलेल्या सप्तरंगांची दखल घ्यावी. नव्हे तर, सप्तरंगांची उधळण करावी आपल्या काव्यांजलीतुन! जे काही भलं-बुरं आपल्या आसपास , समाजात , देशात/विदेशात घडतंय , ते कुठे तरी कवितेत यायला हवे, ती संवेदनशीलता असावी, ती नाळ जिवंत असायला हवी. कवितेचे नानाविध प्रकार लीलया पेलता येतील असं समृद्ध शब्द-भांडार (आणि अनुभव भांडार) हवं. काव्य एकसुरी वाटू नये.

नानाविध अनुभवांचे , संवेदनांचे कंगोरे प्रतिभेच्या कानशीने घासून सौदामिनीसारखे लख्ख प्रगटून वाचकांचे चक्षू (वअंतर्चक्षू) दिपून जावेत..... ते काव्य!!

ना धों महानोरांच्या निधनानंतर सांप्रत मराठी काव्यविश्वात खरोखरच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आहेत; कवी/कवयित्री भरपूर आहेत, अगदी घरोघरी आहेत (त्यात अभिनेत्री-cum-कवयित्री या वर्गाची भर पडली आहे) , पण त्या कविता मनास भिडत नाहीत. (किंबहुना त्या convent मधून शिकलेल्या मराठी नवसाक्षर युवा-पिढीसाठी आहेत असंच वाटतं मला!)

यात भर म्हणून आता Artificial Intelligence ने काव्यलेखनाचं यांत्रिकीकरण केलंय. म्हणजे काय, तर तुम्ही कोणताही विषय द्या (उदा: प्रेम) ते AI tool तुम्हाला एका मिनिटात ती कविता करून देते! तुम्हाला नाही आवडली ,तर परत करून घ्या .. आवडेपर्यंत!

आता याच्या मुळे नजीकच्या भविष्यात गीतकारांवर नक्कीच संकट येऊ शकते.

..आणि तुम्ही एखादी चांगली कविता लिहिलीत तरी "AI tool वापरून केली असेल" असा आरोप तुमच्यावर होऊ शकतो! 😊

१२०+ वर्षांपूर्वी केशवसुतांनी लिहिलेल्या या काव्यपंक्ती मात्र कालौघात काहीशा अर्थ हरवुन बसल्या आहेत..

आम्हांला वगळागतप्रभ झणी होतील तारांगणे,

आम्हांला वगळाविकेल कवडीमोलावरी हे जिणे!”


-प्रशांत